Akher Sosalya Mrutyu Yatana
आभाळाइतकं मोठ संकट असलं तरी, त्यापेक्षा मोठी ताकद आई- वडिलांच्या 'आभाळमाया'मध्ये असते... अमाप वात्सल्याने भारलेले ते हात मग आपल्या जीवश्च-कंठश्च बाळाला मृत्यूच्या कराळ दाढेतूनही अलगद बाहेर काढतात.... याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हे पुस्तक! फक्त एकच ध्यास, प्रबळ इच्छाशक्ती आणि त्यासाठी काहीही करायची तयारी असेल तर जीवघेण्या आजारातूनही आपल्या जीवलगाला कसं बाहेर काढू शकतो, याचे प्रेरणादायी तेजस्वी चित्र या पुस्तकातून नकळत उभं राहते! ज्या 'चिराग'च्या येण्यामुळे चव्हाण दांपत्याच्या जीवनात प्रकाशपर्व निर्माण झाले होते, परंतु त्याच्यावरील आजाराने काळरात्र होते की काय ? असे वाटत असतानाच केवळ वात्सल्य प्रेमाच्या जोरावर साक्षात मरणही नतमस्तक होतो आणि मग नियतीही सहज बोलून जाते... वो 'चिराग' क्या बुझे, जिसे रोशन खुदा करे ! सौ. लक्ष्मी आणि प्रवीण चव्हाण यांच्यातील 'खुदाई'ला लक्ष लक्ष सलाम...! - कादर शेख शिक्षणाधिकारी, गोंदिया